Maharashtra Rain: पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस(rain) पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे उपनगरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.



या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता


मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच पालघर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रासह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.


बांगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला दिसत आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद