मुंबई: राज्यात पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस(rain) पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे उपनगरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच पालघर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रासह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
बांगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला दिसत आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…