Maharashtra Rain: पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस(rain) पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे उपनगरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.



या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता


मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच पालघर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रासह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.


बांगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला दिसत आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या