मुंबई: राज्यात पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस(rain) पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे उपनगरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच पालघर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रासह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
बांगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला दिसत आहे.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी तंबाखू (tobacco) वापरकर्त्यांसाठी…
९ विद्यार्थी जखमी रायगड : आज सकाळी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) हातकणंगले येथे सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या…
नेमकं काय घडलं होतं तेव्हा? पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) ड्रग्जमाफिया ललित पाटील…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का? आमदार नितेश…
'माझ्या एरियात राहायचे नाही,असे म्हणत माचिसची पेटलेली काडी अंगावर फेकली अन्... संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद…
आमदार नितेश राणे यांचा परखड सवाल मुंबई : 'आज सकाळी मोदीजींना भोंदूबाबा म्हणण्याची हिंमत या…