Asian Games 2023: भारतीय खेळाडू रचतायत इतिहास, पारूल-अनूने जिंकले सुवर्णपदक

  158

होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारताचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत पदकांवर शिक्कामोर्तब करत आहे. दहाव्या दिवशी भारताने आतापर्यंत ६९ पदके मिळवली आहेत. यात १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २८ कांस्य पदकांचा समावेश आहे.



भारताची अॅथलीट पारूल चौधरीने मिळवले सुवर्णपदक


भारताची खेळाडू पारूल चौधरीने सुवर्णपदक पटकावले. पारूल चौधरीने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.



थाळीफेकमध्ये भारताला सुवर्णपदक


थाळीफेकमध्ये भारताच्या अनूराणीने इतिहास रचला. अनु राणीने थाळीफेकमध्ये सुवर्णपदकावर कब्जा केला. तिने ६२.९२ मीटर थ्रो करत पहिले स्थान मिळवले.



डीकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरला रौप्य


तेजस्विन शंकरने रौप्यपदक पटकावले. सोबतच डीकॅथलॉन मेंस नॅशनल रेकॉर्ड तोडला आहे. भारताला तब्बल ४९ वर्षांनी आशियाई स्पर्धेत डीकॅथलॉनमध्ये पदक मिळाले आहे. याआधी भारताने शेवटचे १९७४मध्ये आशियाई स्पर्धेत पदक जिंकले होते.



बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदक


भारताचा बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ९२ किलो वजनी गटातील सेमीफायनलमध्ये नरेंद्रला पराभवाचा सामना करावा लागला. सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र