Asian Games 2023: भारतीय खेळाडू रचतायत इतिहास, पारूल-अनूने जिंकले सुवर्णपदक

होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारताचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत पदकांवर शिक्कामोर्तब करत आहे. दहाव्या दिवशी भारताने आतापर्यंत ६९ पदके मिळवली आहेत. यात १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २८ कांस्य पदकांचा समावेश आहे.



भारताची अॅथलीट पारूल चौधरीने मिळवले सुवर्णपदक


भारताची खेळाडू पारूल चौधरीने सुवर्णपदक पटकावले. पारूल चौधरीने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.



थाळीफेकमध्ये भारताला सुवर्णपदक


थाळीफेकमध्ये भारताच्या अनूराणीने इतिहास रचला. अनु राणीने थाळीफेकमध्ये सुवर्णपदकावर कब्जा केला. तिने ६२.९२ मीटर थ्रो करत पहिले स्थान मिळवले.



डीकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरला रौप्य


तेजस्विन शंकरने रौप्यपदक पटकावले. सोबतच डीकॅथलॉन मेंस नॅशनल रेकॉर्ड तोडला आहे. भारताला तब्बल ४९ वर्षांनी आशियाई स्पर्धेत डीकॅथलॉनमध्ये पदक मिळाले आहे. याआधी भारताने शेवटचे १९७४मध्ये आशियाई स्पर्धेत पदक जिंकले होते.



बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदक


भारताचा बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ९२ किलो वजनी गटातील सेमीफायनलमध्ये नरेंद्रला पराभवाचा सामना करावा लागला. सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि