पणजीहून हैदराबादला निघाली होती बस
पणजी : गोव्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खाजगी बसचा भीषण अपघात (Goa Bus accident) झाला आहे. यात चालक जागीच ठार झाला असून इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पणजीहून (Panaji) हैदराबादच्या (Hyderabad) दिशेने निघाली होती. दरम्यान धारबांदोडा येथे या बसला अपघात झाला. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हैदराबादला निघालेली ही बस रस्त्याच्या एका वळणावर आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेत काढले. यावेळेला या बसमध्ये २३ प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन चालक आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत, पैकी ९ जणांची अवस्था गंभीर आहे.
पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये वामशी मुशरी (वय २३), श्वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) आणि शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra