नांदूर शिंगोटे (प्रकाश शेळके /रश्मी मारवाडी) – नांदूर शिंगोटे येथे बायपास लगत असणाऱ्या बंधाऱ्यात हात बांधलेला आणि तोंडात कापसाचा बोळा कोंबलेल्या अवस्थेत पंचवीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या ठिकाणी दोन ते तीन दिवसापासून बेवारस स्थितीत उभी असलेली दुचाकीही आढळली.
हा तरुण लामखेडे मळा तारवाला नगर पंचवटी नाशिक येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नांदूर शिंगोटे येथील बायपास रस्त्यालगत असलेल्या बंधाऱ्यात पूर्णपणे पाणी भरलेले असल्याने मंगळवारी बंधाऱ्यालगत
राहत असलेल्या शेतकरी उत्तम शेळके यांना पाण्यावर डोकेबाहेर असलेला मृतदेह आढळला त्यांनी त्वरित याबाबतची घटना पोलिसांना कळविली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आसपासच्या ठिकाणी पहाणी केली.
याबाबत वावी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी संपूर्ण परिसर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाहणी करून घेतला असता पाण्यावर तरंगणाऱ्या आणि हात बांधलेल्या स्थितीत मृतदेह सापडला. लोखंडे यांनी ही घटना वरिष्ठ पातळीवर आपल्या वरिष्ठांना कळविली. त्यानंतर नाशिक येथून फॉरेन्सिक तज्ञांना बोलवण्यात आले हे पथक आल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी पाण्यावर तरंगणारा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची पूर्ण पाहणी केली.
त्याचप्रमाणे सोमवारी सकाळपासून घटनास्थळाच्या जवळच नाशिक-पुणे महामार्गावर या ठिकाणी बेवारस अवस्थेत एम एच १५ एफ एच ५४३७ या क्रमांकाची पांढऱ्या कलरची एक्टिवा उभी होती. याबाबतही स्थानिक रहिवासी व शेतकरी लोकांनी पोलिसांना माहिती कळविली. सदरच्या गाडीची चौकशी केली असता ती दिंडोरी रोड पंचवटी येथील असल्याचे समजले त्या गाडी मालकाकडे चौकशी केली असता सदरच्या मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. गौरव संपत नाईकवाडे असे त्याचे नाव आहे. तसेच गाडी घेऊन तो रविवारपासून घरीच आला नसल्याचे समजले.
सदरचा प्रकार घातपाताच्या प्रकारातून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर तरूणाच्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथे पाठविण्यात आला. निफाड पोलीस स्टेशनचे अधिकारी निलेश पालवे यांचे मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे चेतन लोखंडे व इतर कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळे नांदुर-शिंगोटे सह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…