मुंबईत सीएनजी ३ आणि पीएनजी २ रुपयांनी स्वस्त

मुंबई : घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर सोमवारपासून लागू झाले आहेत.


मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात ३ रुपयांची तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे मुंबईत आता ७६ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी ४७ रुपयांना मिळेल. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहनांचा वापर करतात. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो. यामुळे महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला दरकपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.


याआधी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत ८ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति एससीएम कपात केली होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करत आहेत. पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मानला जातो.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.