Government jobs reservation : कुठल्या समाजघटकातील किती शासकीय कर्मचारी? आता थेट सर्वेक्षणच करणार!

राज्य सरकारचा मोठा निर्णय...


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला (Maratha Samaj) आरक्षणाचा शब्द दिल्यानंतर इतर समाजाच्या लोकांनीही आपले आरक्षण अबाधित राहावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यातूनच संघर्ष वाढत चालला आहे. शासकीय सेवेत रुजू करुन घेतल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांना तरी याचा पुरेपूर लाभ मिळतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षण असतानाही त्या समाजाचे कमी लोक सरकारी नोकर्‍यांमध्ये (Government jobs) असतात, अशी बाब समोर आल्याने आता राज्य सरकार (Maharashtra Government) स्वतः जातीने लक्ष घालून सर्वेक्षण करणार आहे. कुठल्या समाजघटकातील किती कर्मचारी शासकीय सेवेत आहेत याचा एक अहवाल काढला जाणार आहे.


काल झालेल्या एका बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शासकीय नोकर्‍यांमध्ये ओबीसी (OBC) समाजाला २७% आरक्षण असतानाही केवळ ७ ते ८% लोकच सेवेत आहेत, असा मुद्दा मांडला. या मुद्द्याला विरोध करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आकडेवारी मागवली. त्यामुळे महाराष्ट्रात शासकीय सेवेत कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याचे सर्वेक्षण होणार आहे.


राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. याचे सर्वेक्षण केले जाईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई