Pune Ganeshotsav : पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका अजूनही सुरुच

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले मात्र...


पुणे : दहा दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) काल अखेरचा दिवस होता. आपल्या लाडक्या बाप्पाला काल गणेशभक्तांनी वाजतगाजत निरोप दिला. मुंबईत सकाळपासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरुच होत्या. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सकाळी नऊच्या सुमारास विसर्जन (Immersion) झाले. तर पुण्यात (Pune) सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरुच आहेत. किंबहुना त्या आणखी तीन ते चार तास लांबण्याची शक्यता आहे.


पुण्यातील मानाच्या गणपतींचे काल उशिरा विसर्जन पार पडले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते साडेचार वाजता सहभागी झाले. दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले.


दगडूशेठनंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. तर दीड वाजल्यानंतरही या मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरु झाली नव्हती. त्यामुळे या मिरवणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे.


लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या २०० मंडळांचे गणेश विसर्जन अजून बाकी आहे. तर पुण्यातील सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यामुळे पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. आणखी ३ ते ४ तासांनी सर्व गणपतींचे विसर्जन पार पडेल अशी शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पुण्यात पेट्रोल महागले, इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे