Pune Ganeshotsav : पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका अजूनही सुरुच

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले मात्र...


पुणे : दहा दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) काल अखेरचा दिवस होता. आपल्या लाडक्या बाप्पाला काल गणेशभक्तांनी वाजतगाजत निरोप दिला. मुंबईत सकाळपासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरुच होत्या. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सकाळी नऊच्या सुमारास विसर्जन (Immersion) झाले. तर पुण्यात (Pune) सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरुच आहेत. किंबहुना त्या आणखी तीन ते चार तास लांबण्याची शक्यता आहे.


पुण्यातील मानाच्या गणपतींचे काल उशिरा विसर्जन पार पडले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते साडेचार वाजता सहभागी झाले. दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले.


दगडूशेठनंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. तर दीड वाजल्यानंतरही या मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरु झाली नव्हती. त्यामुळे या मिरवणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे.


लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या २०० मंडळांचे गणेश विसर्जन अजून बाकी आहे. तर पुण्यातील सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यामुळे पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. आणखी ३ ते ४ तासांनी सर्व गणपतींचे विसर्जन पार पडेल अशी शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे