NIA : ६ राज्ये, ५१ ठिकाणांवर एनआयएचा छापा, खालिस्तानी-गँगस्टरवर मोठी कारवाई

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास विभागाने(national investigation agency)  गँगस्टर आणि खालिस्तानी संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे. तपास विभागाने पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील साधारण ५१ ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली. एनआयएकडून दहशतवादी, गँगस्टर आणि ड्र्रग्स डीलर्स यांच्यातील संबंधित ३ केसमध्ये ही कारवाई करण्यात आली.


सर्वाधिक पंजाबमध्ये ३० ठिकाणी एनआयएच्या टीमने छापा टाकला. तर राजस्थानात १३, हरयाणामध्ये ४ आणि उत्तराखंडमध्ये २, दिल्ली एनसीआर आणि यूपीमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली.



तीन गँग एनआयएच्या निशाण्यावर


एनआयएने ज्या ५१ ठिकाणी छापेमारी केली ते लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा गँग आणि अर्श डल्ला गिरोहच्या सदस्यांशी संबंधित आहे. दिल्लीमध्ये भीमा थाना रोडीमध्ये एनआयएची टीम पोहोचली. येथे यादविंदर उर्फ जशनप्रीतच्या घरावर छापा टाकण्यात आला. यदविंदरच्या खात्यामध्ये परदेशातून फंडिंग झाले आहे.


गेल्या काही महिन्यांमध्ये देश तसेच परदेशात खालिस्तानी कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे. पंजाब तसेच हरयाणामध्ये खालिस्तानी दहशतवादी अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे खालिस्तानी दहशतवादी बऱ्याच कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत होती अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे.

Comments
Add Comment

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी