S Jaishankar : आता केवळ काही देशांचाच अजेंडा चालणार नाही - एस. जयशंकर

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांनी अतिशय मुद्देसूदपणे भारताची बाजू मांडली आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले, भारताकडून नमस्कार! यानंतर ते म्हणाले , कोरोना काळानंतर जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. विकसित देशांवर सर्वाधिक दबाव आहे. विश्वासाची पुर्ननिर्मिती आणि जागतिक एकजूट पुन्हा एकदा जागवण्यासाठी यूएनजीएच्या विषयाला आमचे पूर्ण समर्थन आहे.


यावेळी जयशंकर यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षतेबाबत कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की आफ्रीकन युनियन जी-२० संघटनेचा भाग बनला हे भारताचे यश आहे. प्रत्येक संकटकाळात भारताने पुढे होत मदत केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी नाव न घेता कॅनडावर टीका केली. राजकीय सुविधेची मदत घेत दहशतवादावर कारवाई योग्य नाही. सार्वभौमत्वाची काळजी घेतली गेली पाहिजे.


याशिवाय आपल्या भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदलाबाबत भारताने केलेल्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले, काळ बदलत आहे, आता दुसऱ्या देशांचे ऐकावे लागेल. फक्त काही देशांचाच अजेंडा जगावर थोपवला जाऊ शकत नाही. एखादा देश अजेंडा ठरवेल आणि दुसरे देश त्याच्यासोबत जातील हे दिवस संपेल.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू