Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर मार्ग निघाला...

  69

धनगर शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य


अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj reservation) देण्याचा मुद्दा मार्गी लागतो न लागतो तोच धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा पेटून उठला आहे. गेल्या २१ दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर हे उपोषण करत असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आज उपचारासाठी १५ जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवण्यात आली. शिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील चौंडी या ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर धनगर आरक्षणावर जवळपास मार्ग निघाला आहे, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.


याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आंदोलकांशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यांनी सरकार पाठीशी असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र कोणतेही ठोस आश्वासन नसताना कोणत्या आधारावर उपोषण सोडायचे असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. त्यामुळे आज मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंदोलनस्थळी जाऊन धनगर शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळेस झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झालेली आहे. जवळपास मार्ग निघालेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाजन म्हणाले, मराठा आरक्षणाची मुदत संपलेली नाही. त्यासाठी एक समिती नेमलेली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीत निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू, असं महाजन यांनी म्हटलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून