Dhangar reservation : गिरीश महाजनांनी शब्द दिला आणि धनगरांनी उपोषण मागे घेतले

धनगर बांधवांनी दिली ५० दिवसांची मुदत


अहमदनगर : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) पेटून उठलेल्या धनगर समाजानेही (Dhangar reservation) अखेर एकविसाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. आज सकाळीच नगरविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व यावर जवळपास मार्ग निघाला आहे, असे सांगितले. त्यानंतर काही तासांतच महाजनांची शिष्टाई यशस्वी झाली असून धनगरांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळेस धनगर बांधवांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. या वेळेचा योग्य वापर करत लवकरच हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.


गिरीश महाजन म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी सरकार आणि धनगर समाज आरक्षणासंदर्भातील सर्व प्रतिनिधी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात राज्य सरकारने एकमताने धनगरांची मागणी न्याय्य असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला. परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासन अतिशय गंभीर आहे.


पुढे ते म्हणाले, आंदोलनादरम्यान ज्या धनगर समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, ही धनगर समाजाची दुसरी मागणी होती. शासनाने ही मागणीदेखील मान्य केली आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाज आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांनी आम्हाला ५० दिवसांची मुदत दिली आहे. या ५० दिवसांत धनगर आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर कसा मोकळा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं महाजन म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक

Jalgaon Accident : भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटलं अन् विपरीत घडलं, पती-पत्नी जागीच ठार

जळगाव : जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघाताची (Jalgaon Accident News) घटना समोर आली आहे. जळगाव-जामनेर महामार्गावरील (Jalgaon Jamner Highway)

Gold Silver Rate : आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे 'इतक्या' रुपयांची घसरण , चांदीही झाली स्वस्त

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार ( Gold Silver Rate Update ) पहायला मिळत आहे. सोने चांदीचे दर हे

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले