Dhangar reservation : गिरीश महाजनांनी शब्द दिला आणि धनगरांनी उपोषण मागे घेतले

धनगर बांधवांनी दिली ५० दिवसांची मुदत


अहमदनगर : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) पेटून उठलेल्या धनगर समाजानेही (Dhangar reservation) अखेर एकविसाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. आज सकाळीच नगरविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व यावर जवळपास मार्ग निघाला आहे, असे सांगितले. त्यानंतर काही तासांतच महाजनांची शिष्टाई यशस्वी झाली असून धनगरांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळेस धनगर बांधवांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. या वेळेचा योग्य वापर करत लवकरच हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.


गिरीश महाजन म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी सरकार आणि धनगर समाज आरक्षणासंदर्भातील सर्व प्रतिनिधी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात राज्य सरकारने एकमताने धनगरांची मागणी न्याय्य असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला. परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासन अतिशय गंभीर आहे.


पुढे ते म्हणाले, आंदोलनादरम्यान ज्या धनगर समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, ही धनगर समाजाची दुसरी मागणी होती. शासनाने ही मागणीदेखील मान्य केली आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाज आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांनी आम्हाला ५० दिवसांची मुदत दिली आहे. या ५० दिवसांत धनगर आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर कसा मोकळा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं महाजन म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात