Dhangar reservation : गिरीश महाजनांनी शब्द दिला आणि धनगरांनी उपोषण मागे घेतले

  115

धनगर बांधवांनी दिली ५० दिवसांची मुदत


अहमदनगर : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) पेटून उठलेल्या धनगर समाजानेही (Dhangar reservation) अखेर एकविसाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. आज सकाळीच नगरविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व यावर जवळपास मार्ग निघाला आहे, असे सांगितले. त्यानंतर काही तासांतच महाजनांची शिष्टाई यशस्वी झाली असून धनगरांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळेस धनगर बांधवांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. या वेळेचा योग्य वापर करत लवकरच हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.


गिरीश महाजन म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी सरकार आणि धनगर समाज आरक्षणासंदर्भातील सर्व प्रतिनिधी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात राज्य सरकारने एकमताने धनगरांची मागणी न्याय्य असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला. परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासन अतिशय गंभीर आहे.


पुढे ते म्हणाले, आंदोलनादरम्यान ज्या धनगर समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, ही धनगर समाजाची दुसरी मागणी होती. शासनाने ही मागणीदेखील मान्य केली आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाज आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांनी आम्हाला ५० दिवसांची मुदत दिली आहे. या ५० दिवसांत धनगर आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर कसा मोकळा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं महाजन म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून