Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारताची तिसरी सुवर्ण कामगिरी


हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Games 2023) चार घोडेस्वारांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या या घोडेस्वारी संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. याआधी नेमबाजांनी मंगळवारी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तर महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर मात करत सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर घोडेस्वारीमध्ये मिळालेले पदक हे यावर्षीचे तिसरे सुवर्णपदक आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताला घोडेस्वारीमध्ये (Equestrian dressage) सुवर्ण मिळाल्याने सर्वच स्तरांतून भारताच्या घोडेस्वारांचे कौतुक होत आहे.


घोडेस्वारांच्या चमूने मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. दिव्याकृती सिंगला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अनुषला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे हे सुवर्ण भारताच्या नावावर झाले. याआधी १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताला सुवर्ण मिळवण्यात यश आले आहे.


सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून

रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये

अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली

पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणार नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १