Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारताची तिसरी सुवर्ण कामगिरी


हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Games 2023) चार घोडेस्वारांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या या घोडेस्वारी संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. याआधी नेमबाजांनी मंगळवारी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तर महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर मात करत सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर घोडेस्वारीमध्ये मिळालेले पदक हे यावर्षीचे तिसरे सुवर्णपदक आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताला घोडेस्वारीमध्ये (Equestrian dressage) सुवर्ण मिळाल्याने सर्वच स्तरांतून भारताच्या घोडेस्वारांचे कौतुक होत आहे.


घोडेस्वारांच्या चमूने मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. दिव्याकृती सिंगला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अनुषला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे हे सुवर्ण भारताच्या नावावर झाले. याआधी १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताला सुवर्ण मिळवण्यात यश आले आहे.


सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे