Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारताची तिसरी सुवर्ण कामगिरी


हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Games 2023) चार घोडेस्वारांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या या घोडेस्वारी संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. याआधी नेमबाजांनी मंगळवारी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तर महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर मात करत सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर घोडेस्वारीमध्ये मिळालेले पदक हे यावर्षीचे तिसरे सुवर्णपदक आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताला घोडेस्वारीमध्ये (Equestrian dressage) सुवर्ण मिळाल्याने सर्वच स्तरांतून भारताच्या घोडेस्वारांचे कौतुक होत आहे.


घोडेस्वारांच्या चमूने मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. दिव्याकृती सिंगला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अनुषला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे हे सुवर्ण भारताच्या नावावर झाले. याआधी १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताला सुवर्ण मिळवण्यात यश आले आहे.


सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे