PM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

नवी दिल्ली : राजस्थानात(rajasthan) या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी मोठमोठे राजकीय पक्ष तयारी करत आहेत. तर राजस्थान भाजपकडून परिवर्तन संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या समाप्तीनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये एक रॅली संबोधित करणार आहेत.


या दरम्यान ते मंचावर अनोख्या अंदाजात येणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला परिवर्तन संकल्प महासभेत सामील होणार आहेत.


मेघवाल यांनी सांगितले की रॅली स्थळावर ४२ ब्लॉक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकची कमान एका महिलेकडे असणार आहे. येथील व्यवस्था देखरेख महिला करणार आहेत.


मेघवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी खुल्या जीपमध्ये रॅलीमध्ये पोहोचतील. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी दादिया गावात रॅलीच्या अंतिम तयारीचे निरीक्षण केले.


प्रल्हाद जोशी म्हणाले आमच्या परिवर्तन संकल्प यात्रेला भारी समर्थन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधा मोदींच्या रॅलीसाठी राज्यभरातून लोक सोमवारी जयपुरात एकत्र होतील. पंतप्रधान जनसभा संबोधित करण्याआधी धानक्या गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश