PM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

नवी दिल्ली : राजस्थानात(rajasthan) या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी मोठमोठे राजकीय पक्ष तयारी करत आहेत. तर राजस्थान भाजपकडून परिवर्तन संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या समाप्तीनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये एक रॅली संबोधित करणार आहेत.


या दरम्यान ते मंचावर अनोख्या अंदाजात येणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला परिवर्तन संकल्प महासभेत सामील होणार आहेत.


मेघवाल यांनी सांगितले की रॅली स्थळावर ४२ ब्लॉक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकची कमान एका महिलेकडे असणार आहे. येथील व्यवस्था देखरेख महिला करणार आहेत.


मेघवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी खुल्या जीपमध्ये रॅलीमध्ये पोहोचतील. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी दादिया गावात रॅलीच्या अंतिम तयारीचे निरीक्षण केले.


प्रल्हाद जोशी म्हणाले आमच्या परिवर्तन संकल्प यात्रेला भारी समर्थन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधा मोदींच्या रॅलीसाठी राज्यभरातून लोक सोमवारी जयपुरात एकत्र होतील. पंतप्रधान जनसभा संबोधित करण्याआधी धानक्या गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Comments
Add Comment

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ