PM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

नवी दिल्ली : राजस्थानात(rajasthan) या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी मोठमोठे राजकीय पक्ष तयारी करत आहेत. तर राजस्थान भाजपकडून परिवर्तन संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या समाप्तीनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये एक रॅली संबोधित करणार आहेत.


या दरम्यान ते मंचावर अनोख्या अंदाजात येणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला परिवर्तन संकल्प महासभेत सामील होणार आहेत.


मेघवाल यांनी सांगितले की रॅली स्थळावर ४२ ब्लॉक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकची कमान एका महिलेकडे असणार आहे. येथील व्यवस्था देखरेख महिला करणार आहेत.


मेघवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी खुल्या जीपमध्ये रॅलीमध्ये पोहोचतील. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी दादिया गावात रॅलीच्या अंतिम तयारीचे निरीक्षण केले.


प्रल्हाद जोशी म्हणाले आमच्या परिवर्तन संकल्प यात्रेला भारी समर्थन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधा मोदींच्या रॅलीसाठी राज्यभरातून लोक सोमवारी जयपुरात एकत्र होतील. पंतप्रधान जनसभा संबोधित करण्याआधी धानक्या गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Comments
Add Comment

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८