PM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

नवी दिल्ली : राजस्थानात(rajasthan) या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी मोठमोठे राजकीय पक्ष तयारी करत आहेत. तर राजस्थान भाजपकडून परिवर्तन संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या समाप्तीनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये एक रॅली संबोधित करणार आहेत.


या दरम्यान ते मंचावर अनोख्या अंदाजात येणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला परिवर्तन संकल्प महासभेत सामील होणार आहेत.


मेघवाल यांनी सांगितले की रॅली स्थळावर ४२ ब्लॉक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकची कमान एका महिलेकडे असणार आहे. येथील व्यवस्था देखरेख महिला करणार आहेत.


मेघवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी खुल्या जीपमध्ये रॅलीमध्ये पोहोचतील. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी दादिया गावात रॅलीच्या अंतिम तयारीचे निरीक्षण केले.


प्रल्हाद जोशी म्हणाले आमच्या परिवर्तन संकल्प यात्रेला भारी समर्थन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधा मोदींच्या रॅलीसाठी राज्यभरातून लोक सोमवारी जयपुरात एकत्र होतील. पंतप्रधान जनसभा संबोधित करण्याआधी धानक्या गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च