१७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा

महिलांना भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिली महापालिका


ठाणे शहरातील गरीब, गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जात असून तब्बल १७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे. कचरावेचक महिला, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिला, कर्त्या पुरुषाचे तसेच पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच ६० वर्षीय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी हा निधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दिला जातो.


ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण योजनेकरीता तरतूद करण्यात आली होती. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महिलांच्या योजनेमधील निधी वाटपासाठी सहा महिने उशीर झाला होता. पालिकेच्या महासभा ठरावानुसार फक्त ८,२७३ महिलांना आर्थिक लाभ मिळणार होता. मात्र सरसकट महिलांना लाभ देण्याचा निर्णय झाल्यानंतर १७,५२१ महिलांना विविध चार योजनेत पात्र करून समाविष्ट करण्यात आले.
दरम्यान, महापालिकेने योजनेच्या अनुदानात वाढ देखिल केली असून लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून दिला आहे. अशा प्रकारे भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिला महापालिका म्हणून ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रशासनाने गणेशोत्सवात महिलांना आर्थिक मदत करून सणासुदीच्या काळात उत्साहाचे वातावरण केले असल्याने वंचित आणि गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आहे.


कचरावेचक ४५ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपये, असे सात लाख २० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ३२४ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे दोन कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. १५१८ विधवा महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे तीन कोटी ७९ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले. ६० वर्षीय १४,९५२ महिलांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये असे १७ कोटी ९४ लाख २४ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरची वारी केवळ पायी चालणे नाही! यामागचे गूढ आणि सत्य वाचून तुम्हीही थक्क व्हाल...

महाराष्ट्राच्या मातीला संतांचा आणि भक्तीचा मोठा वारसा लाभला आहे. याच वारशाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे 'आषाढी

Baramati Railway Station : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण; ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा सज्ज

बारामती: भारतीय रेल्वेच्या दूरदर्शी 'अमृत भारत स्टेशन योजने' (Amrit Bharat Scheme) अंतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील

Maharashtra Politics : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?

- ४८-२९-२२ चा फॉर्म्युला निश्चित; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यादीवर करणार शिक्कामोर्तब मुंबई : राज्यात

Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत,

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन