१७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा

महिलांना भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिली महापालिका


ठाणे शहरातील गरीब, गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जात असून तब्बल १७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे. कचरावेचक महिला, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिला, कर्त्या पुरुषाचे तसेच पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच ६० वर्षीय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी हा निधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दिला जातो.


ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण योजनेकरीता तरतूद करण्यात आली होती. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महिलांच्या योजनेमधील निधी वाटपासाठी सहा महिने उशीर झाला होता. पालिकेच्या महासभा ठरावानुसार फक्त ८,२७३ महिलांना आर्थिक लाभ मिळणार होता. मात्र सरसकट महिलांना लाभ देण्याचा निर्णय झाल्यानंतर १७,५२१ महिलांना विविध चार योजनेत पात्र करून समाविष्ट करण्यात आले.
दरम्यान, महापालिकेने योजनेच्या अनुदानात वाढ देखिल केली असून लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून दिला आहे. अशा प्रकारे भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिला महापालिका म्हणून ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रशासनाने गणेशोत्सवात महिलांना आर्थिक मदत करून सणासुदीच्या काळात उत्साहाचे वातावरण केले असल्याने वंचित आणि गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आहे.


कचरावेचक ४५ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपये, असे सात लाख २० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ३२४ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे दोन कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. १५१८ विधवा महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे तीन कोटी ७९ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले. ६० वर्षीय १४,९५२ महिलांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये असे १७ कोटी ९४ लाख २४ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर