Dhangar Reservation : आंदोलक उपोषणावर ठाम, धनगर बांधवांचा अंत पाहू नये, आंदोलकांचा इशारा

  48

मुंबई : धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) प्रश्नावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली, पण यातून काहीच तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे. ज्या आरक्षणासाठी धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे, त्याविषयावर योग्य चर्चा झाली नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.


आणखी वेळ द्या अशी राज्य सरकारची मागणी आहे. पण आणखी दोन महिन्यानंतर काय होईल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, पण रिझल्ट मिळत नाही असेही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने म्हटले.


धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यामध्ये आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली. पण आंदोलकांनी त्याला विरोध केला.


आतापर्यंत सरकारने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर कितीतरी वेळ घेतला, आता आणखी वेळ मागून घेत आहेत. धनगर समूदायाला केंद्रात एसटीचा दर्जा असून राज्यात मात्र तो दिला जात नाही असं आंदोलकांच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली.


अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र आज यावर कोणताही तोडगा निघाला नाही.


अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर अशी उपोषणाला बसणा-यांची नावं आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालवल्याने १९ तारखेला पुण्याला ससून रुग्णालयात हलवले, आधी त्यांना १५ तारखेला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे. तर सुरेश बंडगर यांनी देखिल २० तारखेपासून पाणी पिणे सुद्धा सोडले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित