Nature friends: कॉलेजला जाणारी मुलं बनली पर्यावरण दूत...

खानिवली ग्रामपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणपती विसर्जन


खानिवली ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करून तालुक्याला वेगळा संदेश दिला आहे. बुधवारी(दि. २० सप्टेंबर) ग्रामपंचायत खानिवली येथे माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सण-उत्सवाच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती केली.


यावेळी गावातील गणेशभक्तांना आवाहन करण्यात आले होते की, आपला गणपती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करावा, ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गणपतीच्या मूर्तीसोबत जे निर्माल्य आणले जाते ते नदीमध्ये टाकल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे ते निर्माल्य संकलित करण्यासाठी गणेश घाटावर ड्रम ठेवले होते. सर्व निर्माल्य ड्रममध्ये संकलित केल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखले गेले. मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे ते खानिवली ग्रामपंचायतीने करून दाखविले आहे, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच भरत हजारे यांनी दिली.


ग्रामपंचायतीने पर्यावरणाला घातक असलेली परंपरा बदलण्याच्या दृष्टीने आज पहिले पाऊल टाकले आहे, त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानत इतर सर्व ग्रामपंचायतींनी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जित केलेल्या मूर्तींचे विघटन करून तयार झालेल्या लगद्याचे शाळेतील मुलांना वाटप करून त्याच्यापासून अनेक प्रकारच्या कलाकृती करून घेतल्या जाणार आहेत. तसेच जे निर्माल्य गोळा केले आहे त्याच्यापासून खत तयार केले जाणार आहे. अशा प्रकारचा एक पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करणारी खानिवली ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्यामुळे सर्व प्रशासकीय स्तरावरून या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.


संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती पर्यावरण दुतांनी. गावातील कॉलेजला जाणारी मुलांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या दूतांची अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीला मदत होत आहे. मिरवणुकीमध्ये ट्रॅफिकचे नियोजन करणे, विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करून ते ड्रममध्ये टाकणे, गणपती विसर्जन करण्यासाठी मदत करणे हे सर्व काम पर्यावरण दूत अगदी कळकळीने निभावितांना दिसून आले. ग्रामपंचायतीचे हेल्पिंग हॅन्ड म्हणून आज या पर्यावरण दूतांकडे बघितले जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा