Nature friends: कॉलेजला जाणारी मुलं बनली पर्यावरण दूत...

  102

खानिवली ग्रामपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणपती विसर्जन


खानिवली ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करून तालुक्याला वेगळा संदेश दिला आहे. बुधवारी(दि. २० सप्टेंबर) ग्रामपंचायत खानिवली येथे माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सण-उत्सवाच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती केली.


यावेळी गावातील गणेशभक्तांना आवाहन करण्यात आले होते की, आपला गणपती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करावा, ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गणपतीच्या मूर्तीसोबत जे निर्माल्य आणले जाते ते नदीमध्ये टाकल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे ते निर्माल्य संकलित करण्यासाठी गणेश घाटावर ड्रम ठेवले होते. सर्व निर्माल्य ड्रममध्ये संकलित केल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखले गेले. मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे ते खानिवली ग्रामपंचायतीने करून दाखविले आहे, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच भरत हजारे यांनी दिली.


ग्रामपंचायतीने पर्यावरणाला घातक असलेली परंपरा बदलण्याच्या दृष्टीने आज पहिले पाऊल टाकले आहे, त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानत इतर सर्व ग्रामपंचायतींनी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जित केलेल्या मूर्तींचे विघटन करून तयार झालेल्या लगद्याचे शाळेतील मुलांना वाटप करून त्याच्यापासून अनेक प्रकारच्या कलाकृती करून घेतल्या जाणार आहेत. तसेच जे निर्माल्य गोळा केले आहे त्याच्यापासून खत तयार केले जाणार आहे. अशा प्रकारचा एक पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करणारी खानिवली ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्यामुळे सर्व प्रशासकीय स्तरावरून या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.


संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती पर्यावरण दुतांनी. गावातील कॉलेजला जाणारी मुलांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या दूतांची अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीला मदत होत आहे. मिरवणुकीमध्ये ट्रॅफिकचे नियोजन करणे, विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करून ते ड्रममध्ये टाकणे, गणपती विसर्जन करण्यासाठी मदत करणे हे सर्व काम पर्यावरण दूत अगदी कळकळीने निभावितांना दिसून आले. ग्रामपंचायतीचे हेल्पिंग हॅन्ड म्हणून आज या पर्यावरण दूतांकडे बघितले जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या