एक अनोखी प्रथा..., पायाला घुंगरू बांधुन नाचल्याशिवाय होत नाही मान्य

  99

खोपटे गावातील प्रसिद्ध ‘गौरा’ उत्सवाला ८२ वर्षांची परंपरा


उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथिल शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या ८२ वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जूने हे गौरामंडळ असून या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील लोक येतात. सगळीकडे गणेश चतूर्थीची धामधुम सुरू असताना खोपटा ग्रामस्थ हे शंकरांची प्रतिष्ठापना करतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते. संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने भाग घेतात.


१९४१ साली खोपटे पाटीलपाडा येथिल रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाउ बाळाराम भगत,दादु सावळाराम पाटील, जगन्नाथ हसूराम पाटील अशा वीसजणांनी खोपटे पाटीलपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना करत असत कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर दहा वर्षापूर्वी येथे परेशशेठ देडीया यांच्या अर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे अंत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे. तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते.


दरवर्षी गणेशाच्या स्थापनेनंतर येथील शिवमंदिरात गौऱ्याची स्थापनेबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथाप्रसंगाद्वारे संदेश देणारी शाडूच्या मातीतील सुबक चित्रे आणि आकर्षक देखावे असतात. दररोज रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या मंडळातर्फे सतत पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रम, भजन किर्तन, गोंधळ, महिलांचे तसेच पुरूषांचे पारंपारिक नाच यासारखे कार्यक्रम सतत असतात.


गौरीपूजनाच्या दिवशी करतात शिवाची पूजा 
गेल्या ८२ वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधुन नाच झाल्याशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही. नवसाला पावणारा अशी या गौऱ्याची ख्याती आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. ८२ वर्षापासून, याठिकाणी बनविण्यात येणारे देखावे आणि शंकराची मुर्ती फक्त शाडूच्या मातीपासूनच बनविलेली असते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले