women reservation bill: महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत आज चर्चा, सोनिया गांधी करणार सुरूवात

नवी दिल्ली : सरकारने संसदेच्या सभागृहांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण(women reservation bill) देण्याशी संबंधित ऐतिहासिक नारी शक्ती वंदन विधेयक(Nari Shakti Vandan Act) मंगळवारी लोकसभेत सादर केले. मंत्री अर्जुनरागव मेघवाल यांनी विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक सादर केले. नव्या संसद भवनात सादर झालेले हे पहिले विधेयक आहे.


आता या विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. येथे भाजपाकडून केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, दीया कुमारी या आपले मत मांडणार आहेत. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली की काँग्रेसकडून अध्यक्ष सोनिया गांधी याची सुरूवात करतील. अधिकाधिक पक्ष याबाबत आपल्या महिला खासदारांना चर्चेदरम्यान बोलण्याची संधी देऊ शकतात.


लोकसभेत बुधवारी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू होईल. लोकसभा आणि राज्यसभे या दोन्ही सदनात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपती यांची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा कायदा बनेल. हा कायदा बनल्यावर लोकसभेत ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होईल आणि महिला खासदारांची संख्या १८१ होईल.


सध्या लोकसभेता महिला खासदारांची संख्या केवळ ८२ इतकी आहे. या नव्या विधेयकात महिला आरक्षण केवळ १५ वर्षे लागू करण्याची तरतूद आहे. मात्र भविष्यात संसदेत याचा कालावधी वाढू शकतो.

Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)