नवी दिल्ली : सरकारने संसदेच्या सभागृहांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण(women reservation bill) देण्याशी संबंधित ऐतिहासिक नारी शक्ती वंदन विधेयक(Nari Shakti Vandan Act) मंगळवारी लोकसभेत सादर केले. मंत्री अर्जुनरागव मेघवाल यांनी विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक सादर केले. नव्या संसद भवनात सादर झालेले हे पहिले विधेयक आहे.
आता या विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. येथे भाजपाकडून केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, दीया कुमारी या आपले मत मांडणार आहेत. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली की काँग्रेसकडून अध्यक्ष सोनिया गांधी याची सुरूवात करतील. अधिकाधिक पक्ष याबाबत आपल्या महिला खासदारांना चर्चेदरम्यान बोलण्याची संधी देऊ शकतात.
लोकसभेत बुधवारी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू होईल. लोकसभा आणि राज्यसभे या दोन्ही सदनात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपती यांची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा कायदा बनेल. हा कायदा बनल्यावर लोकसभेत ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होईल आणि महिला खासदारांची संख्या १८१ होईल.
सध्या लोकसभेता महिला खासदारांची संख्या केवळ ८२ इतकी आहे. या नव्या विधेयकात महिला आरक्षण केवळ १५ वर्षे लागू करण्याची तरतूद आहे. मात्र भविष्यात संसदेत याचा कालावधी वाढू शकतो.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…