मोदींनी केला नारीशक्तीचा सन्मान!

महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा - अमित शाह

नवी दिल्ली : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महिला आरक्षणावर आज संसदेत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मोदींनी नारीशक्तीचा सन्मान केल्याचे शाह यावेळी म्हणाले.


केंद्रीय गृहमंत्री शाह महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. यावेळी शाह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करत, घाबरू नका, घाबरू नका, असे म्हणाले.


आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, भारत सरकारच्या ९० सचिवांपैकी केवळ ३ ओबीसींचे आहेत. राहुल गांधी म्हणाले, घाबरू नका, आम्ही जात जनगणनेबद्दल बोलत आहोत. अमित शाह म्हणाले की, हे विधेयक युग बदलणार आहे. या विधेयकासाठी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. काही पक्षांसाठी महिला आरक्षण हा राजकीय मुद्दा असू शकतो, निवडणुका जिंकण्यासाठी ते शस्त्र असू शकते, परंतु माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही.





तत्पूर्वी, महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सोनिया गांधी यांनी महिला विधेयकामध्ये आरक्षणाची मागणी केली. अमित शाह यांनी चर्चेत सहभाग घेतल्यानंतर एससी तसेच एसटी वर्गासाठी आरक्षण असल्याचे सांगितले.


महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत भाग घेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ असल्याचे सांगितले. पंचायतींमध्ये महिला आरक्षण हे एक मोठे पाऊल होते. या विधेयकात ओबीसी आरक्षणाची तरतूद असावी, असे ते म्हणाले. महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षण नाही. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. हे विधेयक अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा