Canada Travel Advisory: जम्मू-काश्मीरला जाऊ नका, भारतासोबत वादादरम्यान कॅनडाचा आपल्या नागरिकांना सल्ला

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणावरून(hardeep singh nijjar murder case) सुरू असलेल्या भारतासोबतच्या वादादरम्यान कॅनडाने(canada) आपल्या नागरिकांसाठी मंगळवारी अॅडव्हायजरी जारी केली. यात कॅनडाने आपल्या देशातील लोकांना जम्मू-काश्मीरला(jammu-kashmir) न जाण्याचा सल्ला दिला आहे.


कॅनडाने ही सूचना देण्यामागे सुरक्षेचे कारण असल्याचे सांगितले आहे. जम्मू-काश्मीरला जाऊ नका कारण येथे दहशतवाद, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. कॅनडाने हा सल्ला अशा वेळेस दिला जेव्हा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा एजंट सामील अअसल्याचे म्हटले आहे.


कॅनडाने उचललेल्या या चिथावणीखो पावलावर भारताने कडक प्रतिक्रिया दिली आहे तसेच कॅनडाने भारतावर केलेले आरोप हे निरर्थक असल्याचे म्हटले आहे. सोबतच कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी केली आहे.


 


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काय म्हणाले?


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की भारत सरकारने या प्रकऱणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आम्ही उकसवण्याची अथवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. आम्ही केवळ तथ्य समोर ठेवत आहोत.


ट्रुडो पुढे म्हणाले की, आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी तसेच योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो.


काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी १८ जूनला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका गुरूद्वाराबाहेर निज्जर याची हत्या केली होती. त्यावरून कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने