Canada India dispute: राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात सरकारला एकटे सोडणार नाही, काँग्रेसने दिली साथ

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(canada pm justin trudeau) यांच्याकडून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्याच्या प्रकरणात केंद्र सरकारला(central government) काँग्रेसची(congress) साथ मिळाली आहे. काँग्रेसने सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रकरणात देश सर्वात आधी असेले आणि या मुद्द्यावर केंद्राला काँग्रेसचे समर्थन आहे.


दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय गुप्तचर विभागााचा हात असल्याचा आरोप लगावत कॅनडाने भारताच्या राजदूतांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.


काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर मंगळवारी लिहिले की देशावर जेव्हा जेव्हा दहशतवादाचा धोका येतो तेव्हा एकजूट कायम राखली गेली पाहिजे अशा मताचे काँग्रेस आहे. विशेष म्हणजे ज्या घटनेवरून भारताचे सार्वभौमत्व, एकता तसेच अखंडतेला धोका असेल त्याप्रकरणात काँग्रेस नेहमीच सरकारच्या बाजूने असेल.



अभिषेक मनू सिंघवी यांनी केले सवाल


काँग्रेसचे आणखी एक खासदार अभिषेक मनू सिंह सिंघवी यांनी कॅनडाचे पंतप्रधान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले भारतासाठी जितके धोकादायक शत्रू आहेत तितकेच जस्टिन ट्रुडोही आहेत. सिंघवी यांनी ट्रुडो यांची तुलना धरतीवरील ओझे अशी केली आहे.



काय आहे वाद


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला आहे की खलिस्तानी दहशतवाही हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणा रॉच्या एजंटचा हात आहे. त्यांचे हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. तसेच ट्रुडो हे निरर्थक आणि चिथावणीखोर विधान करत असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलिना जेली यांनी घोषणा केली की एका वरिष्ठ भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नाव पवन कुमार राय आहे. ते रॉचे एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर