Canada India dispute: राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात सरकारला एकटे सोडणार नाही, काँग्रेसने दिली साथ

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(canada pm justin trudeau) यांच्याकडून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्याच्या प्रकरणात केंद्र सरकारला(central government) काँग्रेसची(congress) साथ मिळाली आहे. काँग्रेसने सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रकरणात देश सर्वात आधी असेले आणि या मुद्द्यावर केंद्राला काँग्रेसचे समर्थन आहे.


दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय गुप्तचर विभागााचा हात असल्याचा आरोप लगावत कॅनडाने भारताच्या राजदूतांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.


काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर मंगळवारी लिहिले की देशावर जेव्हा जेव्हा दहशतवादाचा धोका येतो तेव्हा एकजूट कायम राखली गेली पाहिजे अशा मताचे काँग्रेस आहे. विशेष म्हणजे ज्या घटनेवरून भारताचे सार्वभौमत्व, एकता तसेच अखंडतेला धोका असेल त्याप्रकरणात काँग्रेस नेहमीच सरकारच्या बाजूने असेल.



अभिषेक मनू सिंघवी यांनी केले सवाल


काँग्रेसचे आणखी एक खासदार अभिषेक मनू सिंह सिंघवी यांनी कॅनडाचे पंतप्रधान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले भारतासाठी जितके धोकादायक शत्रू आहेत तितकेच जस्टिन ट्रुडोही आहेत. सिंघवी यांनी ट्रुडो यांची तुलना धरतीवरील ओझे अशी केली आहे.



काय आहे वाद


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला आहे की खलिस्तानी दहशतवाही हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणा रॉच्या एजंटचा हात आहे. त्यांचे हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. तसेच ट्रुडो हे निरर्थक आणि चिथावणीखोर विधान करत असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलिना जेली यांनी घोषणा केली की एका वरिष्ठ भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नाव पवन कुमार राय आहे. ते रॉचे एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात