MLAs Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे आदेश

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेप्रकरणाच्या(MLAs Disqualification Case) याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहे. न्यायालयाने राज्याच्या विधानसभा अध्यक्षांनी या अपात्रतेप्रकरणातील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करावी असे आदेश दिलेत. तसेच याबाबतची वेळेची मर्यादा ठरवावी असेही न्यायालयाने सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालयात दोन आठवड्यानंतर याबाबतची सुनावणी करणार आहे. त्यामुळे त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत उचललेल्या गेलल्या कारवाईची माहिती न्यायालयास दिली जावी असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.

अपात्रतेचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबिता राहू शकत नाही


सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटले की अपात्रतेचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबित राहू शकत नाही. उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले की कोर्टाच्या ११ मेच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील राजकीय वादावर निर्णय देताना दिलेल्या आदेशांचा सन्मान केला जाईल अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायलयत करते. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील निर्णयाच्या विलंबाबाबत मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले, अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान केला पाहिजे.

एकनाथ शिंदेना शिवसेना हे नाव तसेच पक्षचिन्ह दिल्याविरोधातही केस आहे दाखल


उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि त्यांचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याविरोधातही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या प्रकरणी ३ आठवड्यानंतर सुनावणी करणार असल्याचे सांगितले.
Comments
Add Comment

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)

फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण! 'परवाना दिलाच नाही, तर आरोप कशाला?'

नाशिक : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) देण्याच्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला