Accident: कोकणात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला धडक, २० जखमी

रायगड: गणेशोत्सवासाठी(ganeshostav) चाकरमनी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, यातच एक दुख:द घटना समोर आली आहे. मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला अपघात(bus accident) झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


ही एसटी बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असताना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले. विनोद पांडुरंग तागडे या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.


या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघाताप्रकऱणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.


१ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असतानाही या मार्गावर अवजड वाहने कशी नेली जातात यावरून आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य