Asia cup 2023: सिराजचा षटकार, श्रीलंका ५० धावांत ऑलआऊट

कोलंबो: मोहम्मद सिराजने घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर भारताने श्रीलंकेला आशिया चषकच्या फायनलमध्ये केवळ ५० धावांवर रोखले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांना तो चांगलाच महागात पडला.


भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात अर्धा डझन विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. सिराजने ६ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने ३ विकेट घेतल्या त्यामुळे संपूर्ण श्रीलंकेला केवळ अर्धशतक ठोकता आले. आशिया चषकातील श्रीलंकेची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे.


आशिया चषक स्पर्धेची फायनल चांगलीच रंगणार असे साऱ्यांनाच वाटत होते. भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ यासाठी सज्ज झाले होते. मात्र श्रीलंकेचा संघ इतक्या कमी धावसंख्येवर ढेपाळेल हे कोणालाच वाटले नव्हते.

भारताचा मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या संघासाठी धोकादायक ठरला. त्याने ७ षटके टाकताना तब्बल अर्धा डझन विकेट काढल्या. श्रीलंकेच्या केवळ दोन फलंदाजांना दोन अंकी संख्या उभारता आली. काही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत.
Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील