Asia cup 2023: सिराजचा षटकार, श्रीलंका ५० धावांत ऑलआऊट

कोलंबो: मोहम्मद सिराजने घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर भारताने श्रीलंकेला आशिया चषकच्या फायनलमध्ये केवळ ५० धावांवर रोखले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांना तो चांगलाच महागात पडला.


भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात अर्धा डझन विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. सिराजने ६ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने ३ विकेट घेतल्या त्यामुळे संपूर्ण श्रीलंकेला केवळ अर्धशतक ठोकता आले. आशिया चषकातील श्रीलंकेची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे.


आशिया चषक स्पर्धेची फायनल चांगलीच रंगणार असे साऱ्यांनाच वाटत होते. भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ यासाठी सज्ज झाले होते. मात्र श्रीलंकेचा संघ इतक्या कमी धावसंख्येवर ढेपाळेल हे कोणालाच वाटले नव्हते.

भारताचा मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या संघासाठी धोकादायक ठरला. त्याने ७ षटके टाकताना तब्बल अर्धा डझन विकेट काढल्या. श्रीलंकेच्या केवळ दोन फलंदाजांना दोन अंकी संख्या उभारता आली. काही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत.
Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना