Asia cup 2023: श्रीलंकेला नमवत भारताने जिंकला आशिया चषक

  135

कोलंबो: वर्ल्डकप २०२३ची रंगीत तालीम असलेल्या आशिया चषकमध्ये भारताने बाजी मारली. भारताने आशिया चषकच्या(asia cup 2023) अंतिम फेरीत श्रीलंकेला एकतर्फी हरवत विजेतेपद पटकावले. पहिल्यापासूनच भारताने श्रीलंकेवर दबाव टाकला त्यामुळे श्रीलंकेला डोके वर काढताच आले नाही.


श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यानेच घात केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आपल्या संपूर्ण संघाचे मिळून केवळ अर्धशतकच ठोकता आले.



सिराजचा भेदक मारा


भारताच्या मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंका हतबल झाली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजसमोर अक्षरश: लोटांगण घातले. लंकेच्या केवळ दोनच फलंदाजाना १७ आणि १३ इतकी धावसंख्या करता आली. तीच त्यांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. बाकी इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.


भारताच्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे अर्धा डझन फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही त्याला सुरेख साथ दिली. त्याने ३ विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला धावसंख्या वाढवूच दिली नाही.



सलामीवीरांनीच पूर्ण केले आव्हान


श्रीलंकेने दिलेले केवळ ५० धावांचे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केले. भारताच्या सलामीला आज इशान किशन आणि शुभमन गिल उतरले होते. इशान किशनने २३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ धावा केल्या आणि भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र