Asia cup 2023: श्रीलंकेला नमवत भारताने जिंकला आशिया चषक

कोलंबो: वर्ल्डकप २०२३ची रंगीत तालीम असलेल्या आशिया चषकमध्ये भारताने बाजी मारली. भारताने आशिया चषकच्या(asia cup 2023) अंतिम फेरीत श्रीलंकेला एकतर्फी हरवत विजेतेपद पटकावले. पहिल्यापासूनच भारताने श्रीलंकेवर दबाव टाकला त्यामुळे श्रीलंकेला डोके वर काढताच आले नाही.


श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यानेच घात केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आपल्या संपूर्ण संघाचे मिळून केवळ अर्धशतकच ठोकता आले.



सिराजचा भेदक मारा


भारताच्या मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंका हतबल झाली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजसमोर अक्षरश: लोटांगण घातले. लंकेच्या केवळ दोनच फलंदाजाना १७ आणि १३ इतकी धावसंख्या करता आली. तीच त्यांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. बाकी इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.


भारताच्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे अर्धा डझन फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही त्याला सुरेख साथ दिली. त्याने ३ विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला धावसंख्या वाढवूच दिली नाही.



सलामीवीरांनीच पूर्ण केले आव्हान


श्रीलंकेने दिलेले केवळ ५० धावांचे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केले. भारताच्या सलामीला आज इशान किशन आणि शुभमन गिल उतरले होते. इशान किशनने २३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ धावा केल्या आणि भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स