Asia cup 2023: आशिया चषक उंचावण्यासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) फायनल सामना अवघ्या काही तासांत सुरू होमार आहे. यावेळी आशिया चषकाचा फायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघादरम्यान आज दुपारी तीन वाजल्यापासून सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर दासुन शनाका श्रीलंकेचे नेतृ्त्व करणार आहे.



भारताचा पाच वर्षांचा दुष्काळ संपणार?


आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २० सामने खेळवले गेले ज्यात भारताने १० सामने जिंकले तर श्रीलंकेला १० सामने जिंकता आले. टीम इंडियाने आतापर्यंत ७ आशिया चषक जिंकले आहेत आणि ५ वेळा फायनलमध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवले आहे. तर ३ वेळा फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला हरवले. यावेळेस फायनलमध्ये भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. भारताने गेल्या ५ वर्षांत कोणतीही आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली नाही.


फायनल सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे फायनल सामन्यात खेळू शकणार नाही. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. सुंदर टीमसोबत आहे.



या खेळाडूंचे प्लेईंग ११ मध्ये पुनरागमन


फायनल सामन्याआधी भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये मोठे बदल होत आहेत. भारताने बांगलादेशविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या सुपर ४ सामन्यात आपल्या पाच मुख्य खेळाडूंना आराम दिला होता. आता फायनल सामन्याआधी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन निश्चित आहे.


आशिया चषक स्पर्धा ही पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकपची पूर्वतयारी मानली जात आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा खिताब जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावणार आहे.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात