Asia cup 2023: आशिया चषक उंचावण्यासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

Share

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) फायनल सामना अवघ्या काही तासांत सुरू होमार आहे. यावेळी आशिया चषकाचा फायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघादरम्यान आज दुपारी तीन वाजल्यापासून सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर दासुन शनाका श्रीलंकेचे नेतृ्त्व करणार आहे.

भारताचा पाच वर्षांचा दुष्काळ संपणार?

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २० सामने खेळवले गेले ज्यात भारताने १० सामने जिंकले तर श्रीलंकेला १० सामने जिंकता आले. टीम इंडियाने आतापर्यंत ७ आशिया चषक जिंकले आहेत आणि ५ वेळा फायनलमध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवले आहे. तर ३ वेळा फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला हरवले. यावेळेस फायनलमध्ये भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. भारताने गेल्या ५ वर्षांत कोणतीही आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली नाही.

फायनल सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे फायनल सामन्यात खेळू शकणार नाही. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. सुंदर टीमसोबत आहे.

या खेळाडूंचे प्लेईंग ११ मध्ये पुनरागमन

फायनल सामन्याआधी भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये मोठे बदल होत आहेत. भारताने बांगलादेशविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या सुपर ४ सामन्यात आपल्या पाच मुख्य खेळाडूंना आराम दिला होता. आता फायनल सामन्याआधी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन निश्चित आहे.

आशिया चषक स्पर्धा ही पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकपची पूर्वतयारी मानली जात आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा खिताब जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावणार आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

16 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

54 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago