Shocking! नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात ३ महिन्यांत १७९ मुलांचा मृत्यू

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली 'लक्ष्य ८४ दिवस' मिशनची घोषणा


नंदुरबार : नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात (Nandurbar Civil Hospital) बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल १७९ मुलांनी आपला जीव गमावल्याची (Shocking) नोंद आहे.


नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सावन कुमार (M Sawan Kumar) यांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये, हॉस्पिटलमध्ये ७५ बालमृत्यूची नोंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या ८६ वर पोहोचली आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १८ अतिरिक्त मृत्यूची नोंद झाली आहे.


कुमार यांच्या मते, या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी ७० टक्के मृत्यूंमध्ये ०-२८ दिवसांच्या मुलांचा समावेश होता.


कुमार यांनी असेही नमूद केले की, या परिसरातील अनेक महिलांना सिकलसेल रोगाचा त्रास होता. ज्यामुळे बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्या. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांचे जीव वाचवण्याची गरज ओळखून, नंदुरबारमधील अधिकाऱ्यांनी 'मिशन लक्ष्य ८४ दिवस' या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. बालमृत्यूची मूळ कारणे हाताळणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि अर्भकांना जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली