Shocking! नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात ३ महिन्यांत १७९ मुलांचा मृत्यू

  125

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली 'लक्ष्य ८४ दिवस' मिशनची घोषणा


नंदुरबार : नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात (Nandurbar Civil Hospital) बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल १७९ मुलांनी आपला जीव गमावल्याची (Shocking) नोंद आहे.


नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सावन कुमार (M Sawan Kumar) यांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये, हॉस्पिटलमध्ये ७५ बालमृत्यूची नोंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या ८६ वर पोहोचली आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १८ अतिरिक्त मृत्यूची नोंद झाली आहे.


कुमार यांच्या मते, या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी ७० टक्के मृत्यूंमध्ये ०-२८ दिवसांच्या मुलांचा समावेश होता.


कुमार यांनी असेही नमूद केले की, या परिसरातील अनेक महिलांना सिकलसेल रोगाचा त्रास होता. ज्यामुळे बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्या. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांचे जीव वाचवण्याची गरज ओळखून, नंदुरबारमधील अधिकाऱ्यांनी 'मिशन लक्ष्य ८४ दिवस' या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. बालमृत्यूची मूळ कारणे हाताळणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि अर्भकांना जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक