मुंबई/विरार : गणपतीचे आगमन (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसावर आले असताना ग्रामीण भागात आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. गणेशाच्या देवपूजेचे सामान, निरनिराळे इतर गरजेचे सामान घेण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी आठवडी बाजारात गर्दी केली होती.
यावेळी गौरी-गणपतीचे सामान, देवाची मखराची आरास करण्यासाठी गर्दी दिसून आली. सणानिमित्त घरातील लहान मुलांना नवीन कपडे खरेदी तर विरार, मांडवी, शिरसाड अशा अनेक गावात व पालघर जिल्ह्यातही सर्वत्र खरेदीची गर्दी पहायला मिळत होती. बाजारात कपड्यांची दुकाने व अनेक वस्तूंच्या दुकानांची रांग दिसून येत होती. बाजारात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.
शनिवार, रविवार व मंगळवारी येणारी सणाची सुट्टी लक्षात घेऊन शहरात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांनी गावी जाण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळीच तयारी केली असून, एक आठवडा गणपतीची सुट्टी घेऊन गणपती विसर्जनानंतरच कामावर हजर होणार असल्याचे काहींनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…