BJP Express by Nilesh Rane : गणपती बाप्पा मोरया! विशेष 'भाजप एक्स्प्रेस'ने चाकरमानी कोकणात रवाना...

  268

निलेश राणे यांनी केले आयोजन


मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात जायला आतुर झालेल्या चाकरमान्यांना खुश करण्यासाठी राणे कुटुंबीय नेहमीच सजग असतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चाकरमान्यांना मोफत गावी जाता यावे यासाठी माजी खासदार निलेश नारायण राणे (Nilesh Narayan Rane) यांनी पुढाकार घेतला. दादर ते कुडाळ (Dadar to Kudal) अशा मोफत 'भाजप एक्स्प्रेस'चे (BJP Express) निलेश राणे यांनी आयोजन केले. याला कोकणवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.


कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांनी आज दादर स्टेशन फुलून गेलं होतं. सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जमा झाली होती. ज्यांनी या सेवेसाठी अर्ज केला होता त्या कोणाचेही नुकसान होऊ नये याची यावेळेस खबरदारी घेण्यात आली. माजी खासदार निलेश राणे यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन तो फडकावला आणि दुपारी १२ वाजता वेळेत ही ट्रेन सोडण्यात आली. यावेळेस रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.


निलेश राणे यांनी हात हलवत सर्वांना निरोप दिला आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व कोकणवासीयांचे चेहरे आनंदाने खुलले होते. ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वांनी निलेश राणे यांचे आभार मानले. आजची ही दादरची दृश्ये आणि 'भाजप एक्स्प्रेस' सुटतानाचे खास क्षण टिपले आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...



दरम्यान, उद्या देखील दुपारी १२:३० वाजता आमदार नितेश राणे यांच्यातर्फे 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस फलाट क्रमांक ८ वरुन सुटणार आहे. शिवाय यामध्ये प्रवाशी गणेशभक्तांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.