Nitesh Rane : चांगल्या कामाला पनवती लावण्याचे काम उबाठाचे नेते आणि संजय राऊत करतात

भाजप आमदार नितेश राणे यांची खोचक टीका


मराठवाड्याप्रमाणे लवकरच आमच्या कोकणातही एक बैठक व्हावी : नितेश राणे


कणकवली : महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक आज मराठवाड्यात (Marathwada) होत आहे. राज्य सरकारकडून मराठवाड्याला भरभरुन देण्याचं काम होणार आहे. पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड सुरु आहे त्यावर पनवती लावण्याचं काम उबाठाचे नेते (Thackeray Group) सातत्याने करत आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण काही राज्यांमध्ये चांगलं झालं की लगेच काळ्या मांजरीसारखं आडवं येणं हे उबाठाचे नेते आणि संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) करत आहेत, अशी जोरदार टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. सरकारच्या चांगल्या कामांवरही सातत्याने टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांचे त्यांनी वाभाडे काढले.


नितेश राणे म्हणाले, मराठवाड्यातील सर्व हॉटेल्स बुक होणं, एवढा खर्च होणं याविषयी हे बोलतात. हॉटेल व्यावसायिकांचं अगर भलं होत असेल तर ते या लोकांना बघवत नाही. पण स्वतःचा मालक मुंबईमध्ये स्पोर्टस आणि रिक्रिएशनच्या जागेवर अनधिकृत पद्धतीने हॉटेल बांधतोय, हे या लोकांना चालतं. संजय राऊतच्या मालकाचा मुलगा महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा दाओसच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा वरुण सरदेसाई आणि इतर लोकांना कोणाच्या पैशांनी घेऊन गेला होता? आणि दाओसचा दौरा काही दिवसांसाठी होता मात्र त्यानंतर सरकारमधील काही शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन लंडनमध्ये नेमकं कोण मौजमजा करत होता? त्याचा खर्च कोणी दिला? असे खडे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.


पुढे ते म्हणाले, ताडोबाला संजय राऊतच्या मालकाचा मुलगा नेहमी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला घेऊन जायचा. त्याचा खर्च कोण उचलत होतं? म्हणजे स्वतःचं सरकार असताना सरकारच्या पैशांचा वापर आपली घरं चालवण्यासाठी करायचा, पैशांची उधळपट्टी करायची, बाहेरगावच्या वाऱ्या करायच्या आणि मग आमचं सरकार जेव्हा मराठवाड्यासाठी, राज्यासाठी काहीतरी चांगलं करत असेल तेव्हा लगेच काळ्या मांजरीसारखं आडवं यायचं, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



आमच्याकडे पण 'प्रहार' वृत्तपत्र आहे...


काल संजय राजाराम राऊत म्हणाला की मी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन बसणार आणि पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार. आमच्याकडे पण 'प्रहार' वृत्तपत्र आहे, आम्ही पण आमच्या संपादकांना घेऊन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत जाणार आणि त्यांना प्रश्न विचारणार की, तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार का केला? आता आदित्य ठाकरेला शेतकरी आठवतात, म्हणजे सत्ता असताना दिनू मौर्यच्या खांद्यावर अणि सत्ता नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर अशी या आदित्य ठाकरेची गत झालेली आहे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.



लवकरच आमच्या कोकणातही एक बैठक व्हावी


आज मराठवाड्यात जशी बैठक होत आहे, तसं मंत्रिमंडळात कोकणातीलही काही मंत्री आहेत. तर माझी अशी अपेक्षा आहे की लवकरच एक बैठक आमच्या कोकणातही व्हावी आणि याबाबत मी सरकारला पत्र लिहिणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण