Aurangabad and Usmanabad : 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' या नावांवर आता शिक्कामोर्तब

विभाग, उपविभाग, तालुका, गाव या सर्वच पातळींवर बदल


मुंबई : राज्यात जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. मात्र, राज्यातील दोन शहरे औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने (State Government) या दोन शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला काही प्रमाणात विरोध झाला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने याबद्दल काल रात्री नोटिफिकेशन काढलं आहे.


नामंतरासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अनेक आक्षेप आले होते. त्या आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नामांतर फक्त शहरापुरतं झालं आहे, जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. मात्र, काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' असं केलं आहे.


सरकारने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, औरंगाबाद जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर उस्मानाबाद जिल्हा आता धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाईल. याचसोबत औरंगाबाद विभाग, उपविभाग, तालुका, गाव छत्रपती संभाजीनगर विभाग, उपविभाग, तालुका, गाव नावाने ओळखले जाणार आहे. हाच बदल उस्मानाबादच्या बाबतीतही धाराशिव या नावाने असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू

Jalgoan : जळगावात एफडीएची मोठी कारवाई ! २१ लाखांचा गुटखा जप्त

Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांच्या बस प्रवासाचा 'डिजिटल कायापालट'; आता कागदी पासची गरज नाही

Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक

Pune Crime : पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; चिनी ॲपच्या माध्यमातून सुरू होता काळा धंदा

पुणे :  पुण्यात (Pune) उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटने (Abortion racket) राज्यभर खळबळ उडवली आहे. या

Beed Boat Accident : अधिकमास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; पुरुषोत्तमपुरीत ५० भाविकांनी भरलेली बोट पलटली; १०-१२ वर्षांचा मुलगा बेपत्ता

बीड : देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास

Navi Mumbai Crime : प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट! प्रेयसीची हत्या, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका गूढ आणि थरारक हत्याकांडाचा (Murder) पनवेल तालुका