मराठवाड्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सरकारची ५९ हजार कोटींची घोषणा

  79

संभाजी नगर : तब्बल सात वर्षांनी संभाजी नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल ५९ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते.


या बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देताना सांगितले की, मराठवाड्यासाठी आज १४ हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या बैठकीत एकूण ५९ हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचा समावेश आहे.


आजच्या बैठकीबद्दल मोठी चर्चा सुरु होती. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना ही बैठक झाली होती. राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकजण म्हणतात फक्त घोषणा होतात. पण, आतापर्यंत आमच्या मंत्रीमंडळाने सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही ३१ निर्णय घेतले होते. २०१७ मध्ये यातील १० विषय मार्गी लागले होते. तर आज घडीला यातील २३ विषय मार्गी लागले असून, ७ विषय प्रगतीपथावर असल्याचे फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखिल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील

वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पोलिस तपासाला सुरुवात

Nanded: नांदेड येथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली

मुलांची मज्जा! ८ आणि ९ जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी! पण कारण काय?

मुंबई : राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई: गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई: तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या