कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार


मुंबई : कोकणच्या लाल माती ओढ असलेल्या चाकरमान्यांसाठी यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग ही जलवाहतूक सेवा १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात येत असून, यामुळे मुंबई-कोकण प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.


एकेकाळी मुंबई ते कोकण अशी सुरू असलेली जलवाहतूक एका अपघातानंतर बंद झाली होती. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या मेहनतीला आता यश आले आहे. 'एम२एम' कंपनीच्या माध्यमातून ही 'रो-रो' फेरी सेवा चालवली जाणार असून, यामुळे सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

७ तासांत विजयदुर्ग गाठणे शक्य


रस्ते वाहतुकीतील कोंडी आणि रेल्वे आरक्षणाची अडचण लक्षात घेता, ही जलवाहतूक सेवा कोकणवासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या सेवेसाठी 'एम२एम प्रिन्सेस' हे आधुनिक जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने नेण्याची त्याची क्षमता आहे. या जहाजामुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्गला पोहोचता येईल.

वेळापत्रक आणि नियोजन


या सेवेची उद्घाटन फेरी १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मुंबईतील 'फेरी व्हार्फ' (भाऊचा धक्का) येथून मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत निघणार आहे.


मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता.
विजयदुर्गहून प्रस्थान : दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता.


तिकीट दर असे
- इकॉनॉमी - ३,०००
- प्रीमियम इकॉनॉमी - ५,०००
- बिझनेस - ७,०००
- फर्स्ट क्लास - ९,०००


वाहनांसाठी शुल्क
- दुचाकी : १,०००
- सायकल : ६००


पर्यटनाला मिळणार चालना


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलवाहतूक प्रोत्साहन धोरणांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक संपर्काला मोठी गती मिळेल," असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. या फेरीसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून, इच्छुकांना www.m2mferries.com, https://www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.


Comments
Add Comment

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल