Toll : मुंबईच्या ‘एन्ट्री’ पॉईंटवरील पाचही टोलनाक्यांवर टोल दरवाढ!

मुंबई : मुंबईत प्रवेश करताना मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Toll) वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे.


येत्या १ ऑक्टोबरपासून टोल दरात १२.५० ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.


हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कार यांच्यासाठी एकेरी टोल ५ रुपये वाढणार आहे.


मिनी बससाठी टोल दरात १० रुपये वाढ होणार आहे. मिनी बसचालकांना आधी ६५ ते ७५ रुपये द्यावे लागत होते.


ट्रक आणि बससाठी १५० रुपये तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.


या एन्ट्री पॉइंट्सवर सन २००२ पासून टोल घेतला जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये टोलदरात सुधारणा करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील सुधारीत दरवाढ ऑक्टोबर २०२६ मध्ये होईल.


दरम्यान, २०२६ नंतर दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड आणि ऐरोली खाडी पूल येथे टोल आकारणी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे टोल बंद झाले तरी ठाणे खाडी पुलाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी येथे टोल सुरू राहिल अशी शक्यता आहे.


एमएमआर भागातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार ही वाढ झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा