Toll : मुंबईच्या ‘एन्ट्री’ पॉईंटवरील पाचही टोलनाक्यांवर टोल दरवाढ!

मुंबई : मुंबईत प्रवेश करताना मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Toll) वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे.


येत्या १ ऑक्टोबरपासून टोल दरात १२.५० ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.


हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कार यांच्यासाठी एकेरी टोल ५ रुपये वाढणार आहे.


मिनी बससाठी टोल दरात १० रुपये वाढ होणार आहे. मिनी बसचालकांना आधी ६५ ते ७५ रुपये द्यावे लागत होते.


ट्रक आणि बससाठी १५० रुपये तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.


या एन्ट्री पॉइंट्सवर सन २००२ पासून टोल घेतला जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये टोलदरात सुधारणा करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील सुधारीत दरवाढ ऑक्टोबर २०२६ मध्ये होईल.


दरम्यान, २०२६ नंतर दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड आणि ऐरोली खाडी पूल येथे टोल आकारणी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे टोल बंद झाले तरी ठाणे खाडी पुलाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी येथे टोल सुरू राहिल अशी शक्यता आहे.


एमएमआर भागातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार ही वाढ झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व