अहमदनगर : महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा घटना सातत्याने घडत आहेत. जी-२० मध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा होता. याशिवाय महाराष्ट्राचे खेळाडू देखील जागतिक पातळीवर आपलं नाव कमावत आहेत. त्यातच आणखी एक अभिमानास्पद बाब म्हणजे अहमदनगरमधील (Ahmednagar) ‘स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल’ (Snehalaya English Medium school) या शाळेची जगातील तीन सर्वोच्च शाळांमध्ये निवड झाली आहे. संकटांवर यशस्वी मात करत वंचितांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा यत्न या शाळेने केला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ही शाळा अविरतपणे हे ज्ञानार्जनाचं काम करत आहे.
आधुनिक प्रयोगशाळा (Science Lab), भौगोलिक पार्क (Geographic park), सहा हजार पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय (Liabrary), विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता कलादालन (Art room), कौशल्य विकास केंद्र या सगळ्या सुविधांमुळे या शाळेला नावाप्रमाणेच स्नेहालय बनवलं आहे. ही शाळा माणुसकीचे धागे जोडत अनाथ, गरजू, वंचित मुलांना तसंच सेक्स वर्कर्सची मुलं, एचआयव्ही बाधित मुलं अशा मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. सध्या शाळेत ३५० मुलं शिक्षण घेत आहेत.
स्नेहालय शाळेच्या संचालिका प्रीती भोवे यांनी सांगितले की, वंचित, अनाथ वर्गांतून जी मुलं येतात त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणं, त्यांचं शिक्षण होणं ही अत्यंत गरजेची बाब होती. आमचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी हे जेव्हा नगरच्या नावाजलेल्या शाळांमध्ये गेले तेव्हा त्यांना या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही पैसे देतो पण आम्ही त्यांना आमच्या शाळेत प्रवेश देऊ शकत नाही अशी उत्तरं मिळायची. तेव्हा त्यांनी या मुलांसाठी स्वतःच शाळा काढायचं ठरवलं. त्यानंतर सिप्ला फाऊंडेशनने आम्हाला ही शाळेची इमारत बांधण्यासाठी मदत केली, असं त्या म्हणाल्या.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि भविष्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कौशल्य विकासाचे धडेसुद्धा इथे दिले जात आहेत. त्यामुळेच स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलची टी-४ शिक्षण संस्थेने (T-4 Education Organisation) जागतिक पातळीवर नोंद घेतली आहे.
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…
मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…
मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…