Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात

मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक


जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.


मनोज जरांगे यांनी भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की आपल्या समाजाच्या पदरात आरक्षण टाकूनच घरी जाईन तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. आमचं उपोषण सोडण्याकरता ते स्वतः वेळ काढून इथे आले त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि आभार, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.


महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून खूप आशा आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या राज्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त एकनाथ शिंदे साहेबांतच आहे. मीदेखील अख्ख्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण मिळवणार आहे. मुख्यमंत्र्यांना एक महिन्याचा वेळ देण्याचा निर्णयदेखील सर्वानुमते घेण्यात आला आहे. समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं, तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे. मला चिठ्ठी देण्यात आली. त्याची लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही. तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका. आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ घ्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या