Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिग्गज क्रिकेटर्सना टाकले मागे, रचला इतिहास

कोलंबो: भारताचा लेफ्ट आर्म स्पिनर कुलदीप यादवने(kuldeep yadav) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट मिळवत भारताला ४१ धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात चार विकेट घेत कुलदीप यादवने इतिहास रचला. कुलदीप यादव सगळ्यात कमी सामन्यांमध्ये १५० विकेट मिळवणारा जगातील पहिला लेफ्ट आर्म स्पिनर बनला आहे. इतकंच नव्हे तर कुलदीप यादव भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी सामन्यात १५० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.


आशिया चषकात शानदार फॉर्म काय राखताना कुलदीप यादवने २ सामन्यात ९ विकेट मिळवल्या. कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट मिळवल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने आपल्या गोलंदाजीत चांगली कामगिरी करत ९.३ ओव्हरमध्ये ४३ धावा देत ४ विकेट घेतल्या.



कुलदीपने जगभरातील दिग्गजांना टाकले मागे


कुलदीप यादवच्या आधी हा रेकॉर्ड बांगलादेशचा स्पिनर अब्दुल रज्जाकच्या नावावर होता. रज्जाकने १०८ सामन्यांत १५० विकेट मिळवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेड हॉजने ११८ सामन्यांत ही कामगिरी केली होती. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ११९ सामन्यात १५० विकेट घेतल्या होत्या. भारताच्या रवींद्र जडेडाला १५० विकेट घेण्यासाठी १२९ सामने खेळावे लागले होते. या सगळ्या दिग्गजांना मागे टाकत कुलदीपने पहिले स्थान मिळवले आहे.


भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान १५० विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शमीने ८० वनडे सामन्यात १५० विकेट मिळवल्या होत्या. कुलदीप यादवने ८८व्या सामन्यात आपले १५० विकेट पूर्ण केले. या पद्धतीने कुलदीप यादव भारताकडून सगळ्यात कमी सामन्यांत १५० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य