विमानात बिघाड झाल्याने भारताने ट्रुडो यांना ऑफर केले होते मोदींचे विमान, मात्र...

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अखेर ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर मायदेशी परतले आहेत. त्यांना रविवारी कॅनडात परतायचे होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस त्यांना भारतातच थांबावे लागले.


सरकारशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने ट्रुडो आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला कॅनडामध्ये परतण्यासाठी एअर इंडिया वन विमानाची ऑफर देण्यात आली होती. मात्र कॅनडाने भारत सरकारची ही ऑफर धुडकावून लावली. भारत सरकारच्या या प्रस्तावाच्या सहा तासानंतर कॅनडा सरकारने सांगितले की ते कॅनडामधून आपले विमान येण्याची प्रतीक्षा करतील.


एअर इंडिया वन बोईंग ७७७ हे विमान आहे ज्याचा वापर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेशी दौऱ्यांसाठी करत असतात.


जी-२० परिषदेत भाग घेतल्यानंतर ट्रुडो रविवारी मायदेशी परतणार होते. मात्र उड्डाणाआधी तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. यानंतर कॅनडाच्या सुरक्षा एजन्सीनी विमान एअरबस CFC001ला उड्डाणापासून रोखले होते.


यानंतर कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळाला भारतातून आणण्यासाठी एक बॅकअप विमान CFC002 येत आहे. दरम्यान, बॅकअप विमान आले नाही. ते विमान दुरुस्त झाल्यानंतर दुपारी १ वाजता रवाना झाले होते.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू