Earthquake: मणिपूरमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

इंफाळ: मणिपूरमध्ये (manipur) सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के(earthquake) जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्रबिंदू राज्यातील उखरूलपासून ६६ किमी दूर होते.


एनसीएसच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप सोमवारी रात्री ११ वाजून एक मिनिट आणि ४९ सेकंदाला झाला होता.



अंदमान समुद्रातही भूकंप


याशिवाय मंगळवारी सकाळी तीन वाजून ३९ मिनिटांनी अंदमानाच्या समुद्रातही भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ४.४ मॅग्निट्यूड इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत ९३ किमी खोल होते.





मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक मृत्यू


गेल्या शुक्रवारी आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात दोन हजारापेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याशिवाय अनेक जण जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भूकंपाचे झटके कासाब्लांकापासून ते मराकेश या देशाच्या विविध भागांत जाणवले. या भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.

Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २