Ajit Pawar : नौटंकी करुन महाराष्ट्राचं भलं होणार नाही

अजित पवारांनी काढले उद्धव ठाकरेंचे वाभाडे


जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यांच्या सभांमध्ये सरकारवर टीका करत असतात. मात्र, अत्यंत गैरकारभारी उद्धव ठाकरेंवर भाजप नेत्यांकडूनही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी जळगाव (Jalgaon) येथे सभा घेतली होती. त्यात तर त्यांनी देवेंद्रजींवर टीका करत हद्द पार केली होती. यावर अजित पवारांनीही (Ajit Pawar) त्यांना खडे बोल सुनावले. आज जळगावातच 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अजितदादांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले.


अजित पवार म्हणाले, "आम्ही कुठेही गेलो तरी विकासाचं बोलतो मात्र काही जण येतात आणि बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का? मी पण वाभाडे काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत. यातून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही", असं अजित पवार म्हणाले.


अजितदादांनी यावेळी जळगावच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वनासनही दिले. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस कमी पडला. त्या तालुक्यात पाऊस पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही अजित पवार म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात