INDIA : इंडिया आघाडीत पुन्हा वाद? हरयाणामध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

  93

नवी दिल्ली : इंडिया (india) आघाडीत पुन्हा वाद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत. असे यासाठी कारण आम आदमी पक्षाने हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा केली आहे. आपचे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक एकट्यानेच लढणार आहे आणि ते अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत.


संदीप पाठक म्हणाले, हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका येत आहे आणि आम आदमी पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व राज्यांमध्ये आम्ही संघटना निर्माण करत आहोत. हरयाणामध्ये सर्कल लेव्हलपर्यंत आमचे संघटन बनले आहे. १५ दिवसांत हरयाणाच्या एक एक गावांत आमची कमिटी बनणार आहे. त्यानंतर आम्ही आमचे कँपेन सुरू करू. हरयाणाच्या जनतेला बदल हवा आहे.


१३ सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठकीबाबत संदीप पाठक म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत जी पार्टनरशिप झाली त्याच्याशी संबंधित मीटिंग उद्या आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. काय अजेंडा असणार आहे याची आयडिया नाही मात्र उमेदवार निवडीपासून ते कँपेन प्लानिंग यावर चर्चा होईल.


सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा लवकर सोडवण्याबाबत सहमती झाली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या