नवी दिल्ली : इंडिया (india) आघाडीत पुन्हा वाद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत. असे यासाठी कारण आम आदमी पक्षाने हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा केली आहे. आपचे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक एकट्यानेच लढणार आहे आणि ते अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत.
संदीप पाठक म्हणाले, हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका येत आहे आणि आम आदमी पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व राज्यांमध्ये आम्ही संघटना निर्माण करत आहोत. हरयाणामध्ये सर्कल लेव्हलपर्यंत आमचे संघटन बनले आहे. १५ दिवसांत हरयाणाच्या एक एक गावांत आमची कमिटी बनणार आहे. त्यानंतर आम्ही आमचे कँपेन सुरू करू. हरयाणाच्या जनतेला बदल हवा आहे.
१३ सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठकीबाबत संदीप पाठक म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत जी पार्टनरशिप झाली त्याच्याशी संबंधित मीटिंग उद्या आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. काय अजेंडा असणार आहे याची आयडिया नाही मात्र उमेदवार निवडीपासून ते कँपेन प्लानिंग यावर चर्चा होईल.
सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा लवकर सोडवण्याबाबत सहमती झाली.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…