Maratha reservation: जालना आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(maratha reservation) आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत जालना तसेच राज्यातील मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


राज्यात कायदा-सुव्यवस्था आबाधित राहावी, जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आहे. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्यात्यावेळेस ते ते राजकीय पक्ष तसेच विरोधी पक्षातील नेत्यांची अशा प्रकारची बैठक झाली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर सरकारने जालना तसेच राज्यात ज्या ठिकाणी आंदोलने झाली त्याबाबत दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


झालेल्या घटनेची खंत साऱ्यांनीच व्यक्त केली आहे. गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनीही जाहीरपणे माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. लाठीचार्जचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील हे ही आपले उपोषण मागे घेण्यास तयार नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर