Accident: बीड-परळी मार्गावरील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

Share

बीड: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (accident) घटना घडली. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रात्री ९च्या सुमारास हा अपघात घडला.

या महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय ३५), नोमान अजीम शेख (वय १३) आणि अदनान अजीम शेख (वय १२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर अजीम शेख हा रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजीम शेख आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन सकाळी गव्हाण येथे सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षेचा चुराडा झाला.

या अपघातात अजीम शेख यांची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वत:गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

9 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

11 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

11 hours ago