Accident: बीड-परळी मार्गावरील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

बीड: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (accident) घटना घडली. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रात्री ९च्या सुमारास हा अपघात घडला.


या महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय ३५), नोमान अजीम शेख (वय १३) आणि अदनान अजीम शेख (वय १२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर अजीम शेख हा रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अजीम शेख आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन सकाळी गव्हाण येथे सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षेचा चुराडा झाला.


या अपघातात अजीम शेख यांची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वत:गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक