Accident: बीड-परळी मार्गावरील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

  99

बीड: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (accident) घटना घडली. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रात्री ९च्या सुमारास हा अपघात घडला.


या महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय ३५), नोमान अजीम शेख (वय १३) आणि अदनान अजीम शेख (वय १२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर अजीम शेख हा रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अजीम शेख आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन सकाळी गव्हाण येथे सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षेचा चुराडा झाला.


या अपघातात अजीम शेख यांची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वत:गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या