Accident: बीड-परळी मार्गावरील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

बीड: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (accident) घटना घडली. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रात्री ९च्या सुमारास हा अपघात घडला.


या महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय ३५), नोमान अजीम शेख (वय १३) आणि अदनान अजीम शेख (वय १२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर अजीम शेख हा रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अजीम शेख आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन सकाळी गव्हाण येथे सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षेचा चुराडा झाला.


या अपघातात अजीम शेख यांची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वत:गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना