G20 Summit : जी-२० साठी आलेल्या प्रत्येक विदेशी पाहुण्याला देणार १,००० रुपये

मोदी सरकारचा हा कोणता नवा फंडा?


नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्ली येथे जी-२०च्या शिखर परिषदेची (G20 Summit) जोरदार तयारी सुरू आहे. सर्व सदस्य राष्ट्रांचे राष्ट्रपती, पंतप्रधान आज भारतात दाखल झाले आहेत. पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. जी-२०ची ही परिषद म्हणजे भारताची प्रगती जगासमोर आणण्याची एक उत्तम संधी आहे आणि या संधीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोनं करत आहेत. डिजीटल पेमेंटच्या (Digital Payment) बाबतीत देशाने केलेली प्रगती सगळ्यांना कळण्यासाठी मोदींनी एक नवा फंडा काढला आहे. यामुळे भारतात डिजिटल व्यवहार किती सोपे झाले आहेत याची इतर देशांना प्रचिती येणार आहे.


भारताच्या प्रगतीत डिजिटल माध्यमाचा मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानात भारत आता कोणत्याही विकसित देशापेक्षा कमी नाही. डिजिटल व्यवहारांनी बँकिंग क्षेत्राला नवे रूप दिले आहे. या यूपीआय (UPI) विषयी माहिती देण्यासाठी सरकारने सर्व पाहुण्यांच्या UPI वॉलेटमध्ये १,००० रुपये हस्तांतरित करण्याची योजना आखली आहे. यामुळे ते भारतात UPI द्वारे व्यवहार करू शकणार आहेत. सुमारे १००० विदेशी प्रतिनिधींसाठी १० लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे.


शिखर परिषदेच्या ठिकाणी अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. सर्व खादी उत्पादने उपलब्ध आहेत. मोदींच्या योजनेनुसार विदेशी प्रतिनिधींच्या वॉलेटमध्ये १००० रुपयांपर्यंतची रक्कम ठेवल्याने त्याद्वारे ते शिखर स्थळावरील स्टॉल्समधून वस्तू खरेदी करु शकतील. यावेळी जी-२० च्या पाहुण्यांना डिजिटल इंडियाबद्दल तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. जेव्हा पाहुणे स्वतः UPI वापरतील, तेव्हा त्यांना कळेल की भारतात डिजिटल व्यवहार किती सोपे झाले आहेत आणि यातून लोकांचे जीवन किती चांगले होत आहे.



फक्त भारतापुरता मर्यादित राहू नये


UPI व्यतिरिक्त, जी-२० प्रतिनिधींना भारताच्या आधार (Aadhar) आणि डिजीलॉकर (DigiLocker) बद्दल देखील माहिती दिली जाईल. UPI चा वापर फक्त भारतापुरता मर्यादित न राहता इतर देशांनीही वापरावा अशी भारत सरकारची योजना आहे. आतापर्यंत श्रीलंका, फ्रान्स, UAE आणि सिंगापूरने उदयोन्मुख फिनटेक आणि पेमेंट सोल्यूशन्सवर भारतासोबत भागीदारी केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक