Radhakrishna Vikhe Patil : भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच

धनगर समाजाच्या कृतीवर राधाकृष्ण विखेपाटलांची प्रतिक्रिया


सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या गोंधळातच आता इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. धनगर समाजही पेटून उठला आहे. आज सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिलेले निवेदन वाचत असताना (Dhangar Reservation Action Committee) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. या घटनेवर विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


विखे पाटील म्हणाले, आज सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात मी धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिली, त्यांचं निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र, अनपेक्षितपणे जो अनुचित प्रकार घडला, यामुळं एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये एवढी भूमिका माझी आहे. भंडारा उधळणं ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे निर्देश दिल्याचं विखेंनी स्पष्ट केलं आहे.


राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो. आपल्या मागण्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. याचसाठी माझा मतदारसंघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन मी त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्यानं उपाययोजना करणं, समस्यांची सोडवणूक करणं यासाठी मी प्रयत्नशील आहे, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून