Radhakrishna Vikhe Patil : भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच

धनगर समाजाच्या कृतीवर राधाकृष्ण विखेपाटलांची प्रतिक्रिया


सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या गोंधळातच आता इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. धनगर समाजही पेटून उठला आहे. आज सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिलेले निवेदन वाचत असताना (Dhangar Reservation Action Committee) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. या घटनेवर विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


विखे पाटील म्हणाले, आज सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात मी धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिली, त्यांचं निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र, अनपेक्षितपणे जो अनुचित प्रकार घडला, यामुळं एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये एवढी भूमिका माझी आहे. भंडारा उधळणं ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे निर्देश दिल्याचं विखेंनी स्पष्ट केलं आहे.


राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो. आपल्या मागण्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. याचसाठी माझा मतदारसंघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन मी त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्यानं उपाययोजना करणं, समस्यांची सोडवणूक करणं यासाठी मी प्रयत्नशील आहे, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ