NDA vs INDIAची फायनल आज, ७ जागांवरील निकाल होणार घोषित

नवी दिल्ली : देशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ६ राज्यांतील ७ विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकीचा (by election) निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल म्हणजेच नुकत्याच निर्माण झालेल्या इंडिया आघाडीसाठी मोठी परीक्षा असणार आहे. मंगळवारी यासाठीचे मतदान पार पडले होते.



सात जागांचा लेखाजोगा


उत्तराखंडमध्ये बागेश्वर, उत्तर प्रदेशात घोसी, केरळमध्ये पुथुपुल्ली, पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी, झारखंडमध्ये डुमरी आणि त्रिपुरामध्ये बॉक्सानगर आणि धनपूर विधानसभा मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान झाले होते. या सात जागांपैकी तीन जागांवर(धनपूर, बागेश्वर आणि धुपगुडी)भाजपची सत्ता तर एक-एक जागेवर सपा(घोसी), सीपीआयएम(बॉक्सनगर), जेएमएम(डुमरी) आणि काँग्रेस(पुथुपुल्ली) यांची सत्ता आहे.


पश्चिम बंगालच्या धुपगुडू आणि केरळच्या पुथुपुल्ली इंडियाचे घटक पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहे. धुपगुडीमध्ये ७६ टक्के तर पुथुपुल्लीमध्ये ७३ टक्के मतदान झाले होते.


उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघात इंडियाने संयुक्त मोर्चा बनवला होता. येथे साधारण ५०.३० टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंडच्या डुमरीमध्ये जिथे २.९८ लाख मतदांरांपैकी ६४.८४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर पाहायला मिळाली. येथे ५५.४४ टक्के मतदान झाले.


Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे