NDA vs INDIAची फायनल आज, ७ जागांवरील निकाल होणार घोषित

नवी दिल्ली : देशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ६ राज्यांतील ७ विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकीचा (by election) निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल म्हणजेच नुकत्याच निर्माण झालेल्या इंडिया आघाडीसाठी मोठी परीक्षा असणार आहे. मंगळवारी यासाठीचे मतदान पार पडले होते.



सात जागांचा लेखाजोगा


उत्तराखंडमध्ये बागेश्वर, उत्तर प्रदेशात घोसी, केरळमध्ये पुथुपुल्ली, पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी, झारखंडमध्ये डुमरी आणि त्रिपुरामध्ये बॉक्सानगर आणि धनपूर विधानसभा मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान झाले होते. या सात जागांपैकी तीन जागांवर(धनपूर, बागेश्वर आणि धुपगुडी)भाजपची सत्ता तर एक-एक जागेवर सपा(घोसी), सीपीआयएम(बॉक्सनगर), जेएमएम(डुमरी) आणि काँग्रेस(पुथुपुल्ली) यांची सत्ता आहे.


पश्चिम बंगालच्या धुपगुडू आणि केरळच्या पुथुपुल्ली इंडियाचे घटक पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहे. धुपगुडीमध्ये ७६ टक्के तर पुथुपुल्लीमध्ये ७३ टक्के मतदान झाले होते.


उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघात इंडियाने संयुक्त मोर्चा बनवला होता. येथे साधारण ५०.३० टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंडच्या डुमरीमध्ये जिथे २.९८ लाख मतदांरांपैकी ६४.८४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर पाहायला मिळाली. येथे ५५.४४ टक्के मतदान झाले.


Comments
Add Comment

PM Modi : "सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन"; टॅरिफ वाद, H-१B बदलांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ठाम भूमिका, मोदी म्हणाले...

गुजरात : गुजरातच्या भावनगरमध्ये आज (२० सप्टेंबर) 'समुद्र से समृद्धी' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

LPG Cylinder Cheaper : ग्राहकांसाठी मोठी गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार का? GST कपातीमुळे घरगुती व व्यावसायिक गॅसवर काय बदलणार?

नवी दिल्ली : देशात येत्या २२ सप्टेंबरनंतर वस्तू व सेवा कर (GST) सुधारणा लागू होणार असून, त्याचा थेट परिणाम

जीएसटी दर कपातीने ४८ हजार कोटींचे नुकसान?

जीएसटी दर कपातीने ४८ हजार कोटींचे नुकसान? नवी दिल्ली : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण केल्याने

मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

चेन्नई: मुंबईहून फुकेत, ​​थायलंडला जाणाऱ्या इंडिगोचे विमान 6E-1089 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या गाडीवर भीषण हल्ला; दोन जवान शहीद, पाच जखमी

इंफाळ, मणिपूर: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर २०२५) सायंकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आसाम

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी