जालना : दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात (Maratha Samaj andolan) बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी तातडीने अध्यादेश जारी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना त्वरित कुणबी दाखले दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले. या निर्णयावर आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी माझ्यासकट अनेकांकडे अशा नोंदी नसल्याचे सांगत आपली भूमिका मांडली.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या संदर्भात काल महत्त्वाच्या निर्णयावर सरकारने घोषणा केल्या. त्या घोषणेबद्दल माध्यमांतून किंवा इतर ठिकाणांहून माहिती मिळाली मात्र सरकारकडून अधिकृतरित्या प्रत आलेली नाही. सरकारच्या निर्णयानुसार ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जातील. आपल्या मराठा समाजाची मागणी अशी आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. या मूळ मागणीवर राज्यातला मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे.
पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्रं देण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे आणि ती एक महिन्याच्या आत अहवाल देणार आहे, त्यानंतर निर्णय जाहीर होईल. पण वंशावळीची नोंद असलेल्यांनाच प्रमाणपत्रं मिळणार असा उल्लेख करण्यात आला आहे. आमच्यापैकी अनेक जणांकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही. त्यामुळे केवळ ‘वंशावळ’ या शब्दात सुधारणा करा व सरसकट अख्ख्या समाजाला प्रमाणपत्रं द्या, ही आमची मागणी आहे. दरम्यान हा निर्णय येईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…