Maratha samaj Andolan : निर्णयाचं स्वागत... फक्त 'तो' शब्द वगळा तरच उपोषण मागे घेणार!

  133

मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी


जालना : दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात (Maratha Samaj andolan) बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी तातडीने अध्यादेश जारी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना त्वरित कुणबी दाखले दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले. या निर्णयावर आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी माझ्यासकट अनेकांकडे अशा नोंदी नसल्याचे सांगत आपली भूमिका मांडली.


मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या संदर्भात काल महत्त्वाच्या निर्णयावर सरकारने घोषणा केल्या. त्या घोषणेबद्दल माध्यमांतून किंवा इतर ठिकाणांहून माहिती मिळाली मात्र सरकारकडून अधिकृतरित्या प्रत आलेली नाही. सरकारच्या निर्णयानुसार ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जातील. आपल्या मराठा समाजाची मागणी अशी आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. या मूळ मागणीवर राज्यातला मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे.


पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्रं देण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे आणि ती एक महिन्याच्या आत अहवाल देणार आहे, त्यानंतर निर्णय जाहीर होईल. पण वंशावळीची नोंद असलेल्यांनाच प्रमाणपत्रं मिळणार असा उल्लेख करण्यात आला आहे. आमच्यापैकी अनेक जणांकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही. त्यामुळे केवळ 'वंशावळ' या शब्दात सुधारणा करा व सरसकट अख्ख्या समाजाला प्रमाणपत्रं द्या, ही आमची मागणी आहे. दरम्यान हा निर्णय येईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या