Maratha Reservation : मुधोजीराजे भोसले यांनी पहा काय मागणी केली!

मराठ्यांना राजकीय आरक्षण नकोच, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा


नागपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पून्हा एकदा पेटून उठला आहे. याबाबत नागपुरातील संस्थानिक आणि भोसले घराण्याचे विद्यमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी वेगळीच मागणी केली आहे. एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, असे मुधोजीराजे भोसले (Mudhojiraje Bhosale) म्हणाले.


एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा. या संदर्भात आपण राज्यातील मराठा संघटनांची चर्चा करुन त्यांची समजूत काढू, सर्वांना समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करु, असेही मुधोजीराजे भोसले म्हणाले.


जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जो प्रकार घडला, तो दुर्दैवी होता. आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजूट होऊन काम करत आहे. अचानक मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीमार नींदनीय आहे, असे मुधोजीराजे म्हणाले.


मराठ्यांची आरक्षणाची मागणी प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी आहे. राजघराणे, उद्योजक यांना आरक्षण नकोय पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच, आम्ही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहोत. जर सरकारला ते द्यायचे नसेल तर सरकारने समान नागरी कायदा करावा आणि सर्वांना समान पातळीवर आणावं. एकदा समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी, असे मुधोजीराजे भोसले म्हणाले.


शिक्षण आणि नोकरी या दोनच मुद्द्यांसाठी आम्ही लढतोय. आम्हाला जमीन द्या किंवा राजकारणात आरक्षण द्या अशी मागणी कोणताही मराठा बांधव करत नाही. मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी किती वर्ष संघर्ष करायचे. त्यामुळे एक तर शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्यावं, नाही तर समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य